ST Strike: ST संपावर सरकारकडून तोडगा, ST च्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या पगारवाढीची घोषणा, पण…

मुंबई तक

मुंबई: एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं यासाठी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, या संपाबाबत आता तोडगा निघाल्याचं दिसतं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवार (24 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं यासाठी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, या संपाबाबत आता तोडगा निघाल्याचं दिसतं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवार (24 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्या मते जी पगारवाढ देण्यात आली आहे ती एसटीच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. मात्र, असं असलं तरीही कर्मचाऱ्यांची जी विलिनीकरणाची मागणी आहे ती अद्याप तरी मान्य करण्यात आलेली आहे. विलिनीकरणाचा निर्णय हा समितीसमोर आहे. ज्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तोवर थांबू नये. त्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

पाहा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार

अनिल परब यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘ज्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp