Mumbai Local Trains: Kasara घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प
कल्याण: महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह ग्रामीण भागात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण-डोंबिवली, शहाड इत्यादी ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवाही बाधित झाले आहेत. कसारा घाट व इतर भागात काही रेल्वे रुळ उखडले गेले आहेत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल ट्रेन सेवा […]
ADVERTISEMENT

कल्याण: महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह ग्रामीण भागात गेले काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कल्याण-डोंबिवली, शहाड इत्यादी ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवाही बाधित झाले आहेत. कसारा घाट व इतर भागात काही रेल्वे रुळ उखडले गेले आहेत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर लोकल ट्रेन सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
रात्रभर मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ, शहाड आदी भागातील पूरस्थिती निर्माण झाली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी लांब पल्ल्याच्या काही गाड्या थांबविण्यात आल्या असून अडकलेल्या रेल्वे प्रवाश्यांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की बुधवारी रात्रीपासून मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते फक्त ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ स्टेशन व टिटवाळापर्यंत सुरू आहे.