मोबाइल बिझी आला अन्, बहीण-भावाने जीव गमावला; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई तक

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील दोन सख्ख्या चुलत बहीण-भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या गोविंद पंडित (वय 18 वर्ष) आणि आनंद विलास पंडित (वय 28 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. नेमकी घटना काय? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पंडित हा आपली बहीण ऐश्वर्या हिचा फोन सतत बिझी येत असल्याने तिच्यावर खूपच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील दोन सख्ख्या चुलत बहीण-भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या गोविंद पंडित (वय 18 वर्ष) आणि आनंद विलास पंडित (वय 28 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पंडित हा आपली बहीण ऐश्वर्या हिचा फोन सतत बिझी येत असल्याने तिच्यावर खूपच नाराज होता. त्यामुळे काल (13 जून) आनंदने ऐश्वर्याला थेट सवाल केला की, ‘तुझा फोन सतत व्यस्त का असतो? तू नेहमी कोणाशी बोलतेस?’

थेट असा प्रश्न विचारल्यमुळे ऐश्वर्या आणि आनंद यांच्यात बराच वाद झाला. यावेळी भाऊ आनंदने रागाच्या भरात ऐश्वर्याच्या कानशिलात लगावली. याच गोष्टीचा ऐश्वर्याला प्रचंड राग आला आणि याच रागाच्या भरात ऐश्वर्याने राहत्या घरी 13 जून रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हे वाचलं का?