एअर इंडियाबद्दलची ‘ती’ माहिती चुकीची! केंद्र सरकारने केला खुलासा

मुंबई तक

केंद्र सरकारने विक्रीस काढलेल्या एअर इंडियाचा लिलावात टाटा सन्सने सर्वाधिक बोली लावत कंपनी मालकी मिळवल्याच्या सूत्रांच्या माहिती आधारे देण्यात आलेलं वृत्त निराधार असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता विभागाने याबद्दल अधिक माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या आणि कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या एअर इंडिया कंपनीच्या विक्रीची प्रक्रिया केंद्राने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्र सरकारने विक्रीस काढलेल्या एअर इंडियाचा लिलावात टाटा सन्सने सर्वाधिक बोली लावत कंपनी मालकी मिळवल्याच्या सूत्रांच्या माहिती आधारे देण्यात आलेलं वृत्त निराधार असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता विभागाने याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या आणि कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या एअर इंडिया कंपनीच्या विक्रीची प्रक्रिया केंद्राने सुरू केली आहे. लिलावाच्या माध्यमातून कंपनीचं निर्गुंतवणुकीकरण केलं जाणार आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या लिलावात टाटा सन्सने बोली जिंकल्याची माहिती समोर आली होती. मात्र, अशी प्रक्रिया झाली नसल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागाने याबद्दल ट्वीट करून माहिती दिली आहे. पीआयबीनेही हे ट्वीट रिट्वीट केलं आहे.

ट्वीटमध्ये काय म्हटलंय?

हे वाचलं का?

    follow whatsapp