चक्रीवादळ: महाराष्ट्राच्या दिशेने सरकतंय ‘टाँकटाई’ वादळ, किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा
मुंबई: महाराष्ट्राच्या (Maharashta) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 16 मे रोजी महाराष्ट्रात धडकण्याची दाट शक्यता आहे. टाँकटाई […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या (Maharashta) पश्चिम किनारपट्टीवर गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ धडकलं होतं. या चक्रीवादळामुळे कोकण (Konkan) किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला होता. आजवरचं ते सर्वात मोठं भीषण असं चक्रीवादळ होतं. या चक्रीवादळाला (Cyclone) वर्षही पूर्ण झालेलं नसताना आता यंदाच्या वर्षातील पहिलं चक्रीवादळ हे 16 मे रोजी महाराष्ट्रात धडकण्याची दाट शक्यता आहे. टाँकटाई असं या चक्रीवादळाला (Tauktae Cyclone) नाव देण्यात आलं असून ते महाराष्ट्र आणि गोव्याच्या दिशेने सरकत असल्याचं सध्या समजतं आहे.
या चक्रीवादळाचा फटका हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्हांना फटका बसू शकतो. या चक्रीवादळामुळे मुंबईसह पालघर आणि ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हात मात्र वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारपासून मुंबई आणि शहर भागात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 14 मे सकाळी अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून 15 मे रोजी हा कमी दाबाचा पट्टा लक्षव्दीप बेटांजवळ सरकणार असल्याचं सध्या तरी दर्शवत आहे.
महाबळेश्वरमध्ये तुफान गारपीट, स्थानिकांसह नागरिकांचं रस्त्यावर स्केटिंग