टीईटी घोटाळा : 7,800 नापास उमेदवारांना पैसे घेऊन केलं पास; समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई तक

राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून तिन्ही परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, टीईटी घोटाळ्यातील आरोपींनी तब्बल पात्र नसलेल्या 7,800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं आहे. हेच अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून तिन्ही परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, टीईटी घोटाळ्यातील आरोपींनी तब्बल पात्र नसलेल्या 7,800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं आहे. हेच अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या म्हणजेच नापास झालेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना अनुत्तीर्ण झाल्यानंतर पैसे घेऊन पास करण्यात आलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून ही माहिती उजेडात आली आहे.

आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षा अन् कोट्यवधींचा भ्रष्टाचार; पोलिसांना आतापर्यंत काय सापडलं?

2019-20 मध्ये TET पेपर-1 ची 1 लाख 88 हजार 688 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. तर पेपर दोनसाठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवार उपस्थित होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp