OBC आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे सपशेल दुर्लक्ष -फडणवीस
OBC आरक्षण प्रकरणाकडे ठाकरे सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ओबीसी प्रवर्गातून जे लोक निवडून आले त्यांची निवडणूक सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे संकट उभे ठाकरे आहे. आमच्या सरकारकारच्या काळातही आम्ही अध्यादेश काढला होता पण हे सरकार आल्यानंतर त्यांनी अध्यादेश रद्द […]
ADVERTISEMENT

OBC आरक्षण प्रकरणाकडे ठाकरे सरकारने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ओबीसी प्रवर्गातून जे लोक निवडून आले त्यांची निवडणूक सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे संकट उभे ठाकरे आहे. आमच्या सरकारकारच्या काळातही आम्ही अध्यादेश काढला होता पण हे सरकार आल्यानंतर त्यांनी अध्यादेश रद्द होऊ दिला असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
ओबीसी आरक्षणाचा नेमका विषय काय आणि वाद काय?
आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आत्ता ज्या पाच जिल्हा परिषद निवडणुका झाल्या या पाचही जिल्ह्यांमध्ये ओबीसीचे जेवढे लोक निवडून आले त्या सगळ्यांना बेदखल करण्यात आलं आहे. पुन्हा नव्याने त्यांची निवडणूक घेण्याचं सांगण्यात आलं आहे. हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. येत्या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये आता हाच प्रश्न निर्माण होणार आहे. कारण यासंदर्भात संपूर्ण डेटा नाही, आयोग नेमला नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे निवडणुकीत जे आरक्षण ओबीसींना दिलं गेलं आहे त्यावरच प्रश्न निर्माण झाला आहे