दुर्दैवी घटना! 12 वर्षाच्या मुलासह तिघांचा गोदावरीत बुडून मृत्यू; नाशिकमधील घटना

मुंबई तक

मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. गोदापात्रात अंघोळीला उतरल्यानंतर या घटना घडल्या असून, नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीचं पात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच धरणातून विसर्ग होत असल्यानं गोदावरीत न […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुसळधार पावसाने दुथडी भरून वाहत असलेल्या गोदावरीत तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. गोदापात्रात अंघोळीला उतरल्यानंतर या घटना घडल्या असून, नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीचं पात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच धरणातून विसर्ग होत असल्यानं गोदावरीत न उतरण्याचा इशारा दिलेला असतानाच तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली आहे. उत्तम नगर येथील महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आलं होतं. महाजन कुटुंबातील रावसाहेब महाजन यांचा अचानक पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले.

या घटनेची माहिती जीवरक्षक जवानांना देण्यात आली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या रावसाहेब महाजन यांचा शोध घेत असतानाच जीवरक्षक जवानांना आणखी एक मृतदेह आढळून आला.

हे वाचलं का?