देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वॉर.. जाणून घ्या कारण

मुंबई तक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली. या समितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलं. ज्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. मग फडणवीसांनी आणखी एक उत्तर दिलं.. त्या उत्तरावरही प्रत्युत्तर देण्यात आलं. सोशल मीडियावर या दोन नेत्यांमधलं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? न्यायालयीन आयोगाचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली. या समितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलं. ज्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. मग फडणवीसांनी आणखी एक उत्तर दिलं.. त्या उत्तरावरही प्रत्युत्तर देण्यात आलं. सोशल मीडियावर या दोन नेत्यांमधलं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

न्यायालयीन आयोगाचे अधिकार या समितीला नाहीत. त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांचं गांभीर्य या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर या समितीला काही अर्थ उरत नाही. तसंच हा प्रश्न उरतोच की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांच्याविरोधात चौकशी कशी करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. टीका करत असताना फडणवीस यांनी झोटिंग समितीचाही दाखला दिला होता. खडसेंची चौकशी करताना आम्ही झोटिंग समिती स्थापन केल्याची बाब देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केली.

परवानगीशिवाय रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले, नंतर मुख्यमंत्र्यांसमोर रडल्या – जितेंद्र आव्हाड

हे वाचलं का?

    follow whatsapp