‘अशा लोकांना पक्षाने कापून फेकून दिलं पाहिजे’; उदयनराजे भोसलेंच्या संतापाचा कडेलोट

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज असलेल्या उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली असून, पंतप्रधान मोदींकडे भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी केलीये. संतापलेल्या उदयनराजे भोसले यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज असलेल्या उदयनराजे भोसलेंनीही उडी घेतली असून, पंतप्रधान मोदींकडे भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी केलीये.

संतापलेल्या उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारींची अक्कलच काढली. तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींना भिकारडा म्हणत सुनावलंय. गँगरीन झाल्यावर जसा शरीराचा भाग कापून टाकतात, तसंच ह्या लोकांना पक्षाने कापून फेकून द्यावं, अशी भूमिका मांडत उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केलीये.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानावर उदयनराजे भोसले काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “कोण काय म्हणतंय यापेक्षा प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, वाटचालीला सुरू करत नाही. आज महाराष्ट्रात काय सुरूये. राज्यपाल पद सन्मानाचं पद आहे. सन्मानाच्या पदावर विराजमान असतात, निदान त्या माणसाला अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे. एक-दोनदा त्यांनी हे केलंय”, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलीये.

राज्यपालांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ काढण्यात आले : वादावर फडणवीस आणखी काय म्हणाले?

हे वाचलं का?

    follow whatsapp