Uddhav Thackeray: भर उन्हात.. ठाकरेंनी घातला कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात, भाषण जसंच्या तसं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray criticized pm modi along with CM Shinde: मुंबई: मुंबईतील (Mumbai) ‘मातोश्री’ या (Matoshri) निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (18 फेब्रुवारी) थेट रस्त्यावर येऊन प्रचंड गर्दीत कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं असं भाषण केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली आहे. पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. (uddhav thackeray made a speech outside matoshree strongly criticized pm modi along with shinde)

लोकांच्या गराड्यात, गाडीमध्ये उभं राहून उद्धव ठाकरेंचं भाषण…

‘आज महाशिवरात्र आहे आणि उद्या शिवजयंती आहे. या दिवसांचं मुहूर्त बघून शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चोरलंय. पण ज्यांनी चोरलंय त्यांना हे माहित नाही की, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा आस्वाद त्यांनी घेतलाय. पण मधमाशांचा डंख आता मारायची वेळ आली आहे.’

‘मला कल्पना आहे की, तुम्ही सगळेजण चिडलेले आहात. असा कोणताही पक्ष नसेल की, ज्यांच्यावर गेल्या 75 वर्षात असा आघात केला असेल. पण भाजप आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की, त्यांच्या हाताशी ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या गुलाम बनलेल्या त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही.’

‘माझं आव्हान आहे… निवडणूक आयुक्तांनी जी काल गुलामी केली आहे.. गुलामीच मी म्हणतो. कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर कुठले तरी राज्यपाल होऊ शकतील. सांगता येत नाही. कारण आताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. हे असे गुलाम त्यांनी अवतीभवती ठेवले आहेत. त्या गुलामांना मी आव्हान देतोय. शिवसेना कोणाची. हे तुम्ही तुमच्या मालकाच्या आदेशाने ठरवू शकणार नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘कोणालाही विचारा शिवसेना कोणाची.. यांचा जो डाव चालला आहे.. यांना ठाकरे नाव पाहिजे बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण शिवसेनेचं कुटुंब नकोय. आपल्यावर जेव्हा आरोप केले जात होते की, तुम्ही मोदींचं नाव घेऊन मतं मिळविली तेव्हा आमची युती होती. एक जमाना जरूर होता की, जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होते. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रासमोर यावं लागतंय. ही आपल्या शिवसेनेची ताकद आहे.’

Devendra Fadnavis: पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात: फडणवीस

‘आज महाराष्ट्रात मोदींच्या नावाने मतं मिळू शकत नाही. मोदींसुद्धा बाळासाहेबांचा मुखवटा घालून यावं लागतंय. हा आपला मोठा विजय आहे. पण महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की, असली चेहरा कोणता आणि मुखवटा कोणता.’

ADVERTISEMENT

‘म्हणून मी पुन्हा एक आव्हान देतोय की, ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं, आपलं पवित्र धनुष्यबाण चोराला दिला गेला. ज्या पद्धतीने कपट-कारस्थानाने हे राजकारण करतायेत कदाचित आपली मशाल निशाणा सुद्धा काढू शकतील. पण माझं आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने ज्यांनी धनुष्यबाण चोरलाय ते जर मर्द असतील तर त्यांना मी सांगतोय तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो.’

‘कारण धनुष्यबाण पेलायला सुद्धा मर्द लागतो. रावणानेसुद्धा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. काय झालं.. उताणा पडला. तसंच हे चोर आणि चोरबाजारचे मालक हे शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास वाटतो.’

ADVERTISEMENT

‘मी कुठे खचलेलो नाही.. मी कुठे खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. कदाचित उद्या मी फेसबुक लाईव्ह करेन त्यावेळी निवडणूक आयोगाने आपल्याला काय-काय सांगितलं होतं आणि आपण कशी पूर्तता केली. हे मी विस्ताराने सांगेन मग तुम्ही ठरवायचं आहे कोणाचं चुकलं.’

Shiv Sena: शिवसेनेची लढाई जिंकल्यानंतर शिंदेंनी कसं केलं सेलिब्रेशन?

‘गेल्या 75 वर्षात असं कधीही घडलं नव्हतं. अगदी काँग्रेसही फुटली होती तेव्हा त्यांचं चिन्ह गोठवलं होतं. दुसऱ्या गटालं ते गेलं नव्हतं. समाजवादी पक्षाच्या वेळेस देखील समोरून दावा सोडला गेला म्हणून ते चिन्ह तिकडे टिकलं. जयललिता आणि जानकी रामचंद्रन यांच्यातील वाद मिटला म्हणून ते चिन्ह त्यांना मिळालं. अन्यथा असा वाद जेव्हा-जेव्हा झालाय तेव्हा कोणत्याही एका गटाला मूळ जे चिन्ह असतं ते चिन्ह आणि नाव दिलेलं नाही. ते या पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी दिलं आहे.’

‘लढाई तर आता सुरू झालेली आहे. माझ्या हातात आज काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. मी एवढंच सांगतोय. ही सगळं जे काही तरूण रक्त आहे. जे पेटवलेलं आहे.. शिवसेनेचा संयम पाहिला आहे. शिवसैनिकाचा राग पाहू नका.’

‘काल ज्याच्या हातात धनुष्यबाण होता त्याच्या गळ्यात जणू काही मी चोर आहे अशी पाटी घातल्यासारखा चेहरा होता. ही चोरी आपण त्याला पचू द्यायची नाही.’

‘मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलो आहे. मी तुमच्यासोबत पहिल्यापासून होतो. पण खांद्याला खांदा लावून. आता राजकारणात या चोरांचा आणि या चोरांच्या मालकांचा नायनाट केल्याशिवाय राहायचं नाही. ही शपथ घेऊन पुढे चालत राहू. कोणाच्या कितीही पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना कोणी संपवू शकत नाही.’ असं घणाघाती भाषण उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT