Vaccination बाबत मोदी सरकारच्या कोणत्या चुकीच्या निर्णयांमुळे भासतोय लस तुटवडा?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे तसंच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी सौम्य होती असं म्हणायची वेळ आली आहे इतकी दुसरी लाट भीषण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. तरीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो आहे. मोदी सरकारने नेमक्या काय चुका […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर माजवला आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होतो आहे तसंच अनेकांचे मृत्यूही झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी सौम्य होती असं म्हणायची वेळ आली आहे इतकी दुसरी लाट भीषण आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. तरीही देशातल्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा भासतो आहे. मोदी सरकारने नेमक्या काय चुका केल्या आहेत. लसीकरणाच्या बाबतीत मोदी सरकारने नेमक्या काय चुका केल्या आहेत जाणून घेऊया.
जगातला सर्वात मोठा लसीकरण उत्सव असं आपण आपल्या लसीकरण मोहीमेचं वर्णन केलं. मात्र जानेवारी महिना ते मे महिना या कालावधीतलं लसीकरण पाहिलं तर लक्षात येतं की मागील काही दिवसांपासून लसीकरण मोहिम मंदावली आहे. याच गतीने जर लसीकरण होत राहिलं तर दोन, तीन कितीही वर्षे लसीकरणासाठी लागू शकतात.
18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण थांबलं, याला जबाबदार कोण?
पहिली चूक