बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘गुलाब’ नाव कुणी दिलं?
निसर्ग आणि तौतेनंतर आणखी एका चक्रीवादाळाचा भारताला तडाखा बसणार आहे. यापूर्वीची दोन्ही चक्रीवादळांचा थेट महाराष्ट्रावर परिणाम झाला होता. तर आता घोंगावत असलेलं चक्रीवादळ आंध्र प्रदेश व द ओडिशाच्या किनारापट्टीला धडकणार आहे. या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आलं आहे. हे नाव कुणी दिलं आणि चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात याबद्दल जाणून घेऊयात… भारतात आणि जगभरात […]
ADVERTISEMENT

निसर्ग आणि तौतेनंतर आणखी एका चक्रीवादाळाचा भारताला तडाखा बसणार आहे. यापूर्वीची दोन्ही चक्रीवादळांचा थेट महाराष्ट्रावर परिणाम झाला होता. तर आता घोंगावत असलेलं चक्रीवादळ आंध्र प्रदेश व द ओडिशाच्या किनारापट्टीला धडकणार आहे. या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आलं आहे. हे नाव कुणी दिलं आणि चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात याबद्दल जाणून घेऊयात…
भारतात आणि जगभरात सातत्यानं चक्रीवादळ निर्माण होतात. त्यामुळे निरनिराळ्या देशात धडकणारी चक्रीवादळं आणि चक्रीवादळांना देण्यात आलेली नावं हाही रंजक आणि समजून घेण्यासारखा विषय आहे.
चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात?
चक्रीवादळांना देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे चक्रीवादळाला नाव दिलं की, त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणं आणि लक्षात ठेवणं सोयीचे आणि सोप जातं. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना बसण्याची शक्यता असते, ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात.









