समजून घ्या : Twitter India आणि मोदी सरकारमध्ये नेमका वाद काय? का दाखल झाला FIR?
गेल्या महिन्याभरापासून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे….पण असं नेमकं घडलंय काय? ज्या ट्विटरवर राजकीय नेत्यांपासून ते अगदी सामान्य नेटकऱ्यापर्यंत सगळेच जण आपलं मत व्यक्त करतात, ते ट्विटर बंद होणार का? भारतात ट्विटरला असलेली कायदेशीर सुरक्षा संपली आहे म्हणजे नेमकं काय झालंय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर त्याची उत्तरं समजून घेऊयात…. सगळ्यात पहिले […]
ADVERTISEMENT
गेल्या महिन्याभरापासून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे….पण असं नेमकं घडलंय काय? ज्या ट्विटरवर राजकीय नेत्यांपासून ते अगदी सामान्य नेटकऱ्यापर्यंत सगळेच जण आपलं मत व्यक्त करतात, ते ट्विटर बंद होणार का? भारतात ट्विटरला असलेली कायदेशीर सुरक्षा संपली आहे म्हणजे नेमकं काय झालंय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर त्याची उत्तरं समजून घेऊयात….
सगळ्यात पहिले समजूयात ट्विटर आणि मोदी सरकारमध्ये नेमका काय वाद आहे?
देशात गेल्या काही वर्षात मॉब लिंचिंग, दंगली, काश्मिरचा विशेष दर्जा काढणारं कलम 370 अशा अनेक संवेदनशील आणि वादग्रस्त घटना घडल्या, ज्यामधून अफवा, गैरसमज पसरवले जात होते. अशा घटना घडल्या की हल्ली व्यक्त होण्यासाठी हक्काचं ठिकाण ठरलंय, ते म्हणजे सोशल मीडिया. पण याच सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या कंटेटबाबत कोणताही नियम नव्हता.
जसं टीव्हीवर, चित्रपटांमध्ये काय दाखवण्यात यावं, काय दाखवू नये, याबाबत केंद्र सरकारची नियमावली आहे, तशी डिजिटल मीडियासाठी नव्हती. आणि म्हणूनच डिजिटल मीडियावरून पोस्ट होणाऱ्या कंटेटमध्ये काही अश्लील असेल, आक्षेपार्ह असेल, लहान मुलांवर परिणाम करणारं असेल, महिलांविरोधी असेल, प्रक्षोभक असेल, तर त्यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आयटी अक्टमध्ये बदल केले.










