Modi Cabinet Reshuffle: Narayan Rane यांच्यासह Maharashtra मधील मंत्र्यांना मोदींनी कोणती खाती दिली?

मुंबई तक

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet reshuffle) पार पडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खाते वाटपात मोठे बदल केले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) जे चार मंत्री (Minister) आता केंद्रात गेले आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मंत्रिमंडळात पूर्वीपासून जे महाराष्ट्रातील मंत्री आहेत त्यांना नेमकं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet reshuffle) पार पडल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी खाते वाटपात मोठे बदल केले आहेत. पण यामध्ये महाराष्ट्रातून (Maharashtra) जे चार मंत्री (Minister) आता केंद्रात गेले आहेत त्यांना नेमकं काय मिळालं हे आपण पाहणार आहोत. याशिवाय मंत्रिमंडळात पूर्वीपासून जे महाराष्ट्रातील मंत्री आहेत त्यांना नेमकं काय मिळालं यावरही आपण एक नजर टाकणार आहोत.

मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान महाराष्ट्रातून नारायण राणे, (Narayan Rane) भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील यांना पसंती देण्यात आली. जाणून घेऊयात या मंत्र्यांना मंत्रिमंडळात नेमकी कोणती खाती मिळाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा नेमका काय परिणाम होणार.

नारायण राणे: मंत्रिमंडळ विस्तार जे नाव सर्वाधिक चर्चेत होतं ते म्हणजे नारायण राणे यांचं. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्री पद यावेळी देण्यात आलं आहे.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. तेव्हा नारायण राणे हे शिवसेनेत होते. पण नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2018 साली त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि स्वत:चा स्वाभिमानी पक्ष स्थापन केला होता. पण 2019 मध्ये त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन करुन टाकला.

हे वाचलं का?

    follow whatsapp