जिथे माणूस राक्षस होतो… देशातील 5 मोठ्या दंगलींची थरारक कहाणी!
नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट समाजात हिंसाचार भडकत आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीला काढण्यात आलेल्या अनेक रॅलीमध्ये असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे देशातील वातावरण अधिक गढूळ होत चाललं आहे. राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील अचलपूर येथे दोनच दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. ज्यामुळे इथे संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट समाजात हिंसाचार भडकत आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीला काढण्यात आलेल्या अनेक रॅलीमध्ये असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे देशातील वातावरण अधिक गढूळ होत चाललं आहे.
राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील अचलपूर येथे दोनच दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. ज्यामुळे इथे संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. देशात यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. पण असं असलं तरी देशातील पाच दंगलींमध्ये माणसाने मृत्यूचा अक्षरश: नंगानाच केला होता. ज्याने अवघा देश त्या-त्या वेळी हादरुन गेला होता. चला तर मग आज जाणून घेऊया देशातील पाच मोठ्या दंगलींबद्दल ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता.
1. शीख दंगल (1984)
देशातील प्रमुख दंगलींपैकी एक म्हणजे 1984 ची शीख दंगल. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हा प्रकार घडला होता. खरे तर त्यांच्या अंगरक्षकानेच इंदिरा गांधींची हत्या केली होती. ज्या दोन अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली ते दोघेही शीख होते. त्यामुळेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशातील लोक शिखांच्या विरोधात अनेक जण भडकले होते.