दिलीप वळसे-पाटलांना पवारांनी गृहमंत्री का केलं?

मुंबई तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या बराच अडचणीत सापडला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी कोणत्या नेत्याची निवड करायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निर्माण झाला होता. पण अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुनेजाणते नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्री म्हणून निवड केली आहे. शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या बराच अडचणीत सापडला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी कोणत्या नेत्याची निवड करायचा असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पुढे निर्माण झाला होता. पण अशावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जुनेजाणते नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्री म्हणून निवड केली आहे.

शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचीच निवड का केली?

दिलीप वळसे-पाटील ही थेट शरद पवार यांनी केलेली निवड आहे. वळसे-पाटील हे पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वळसे-पाटील यांची गेल्या काही वर्षात प्रकृती थोडीशी ठीक नसल्याने ते सार्वजनिक जीवनात कमी दिसत होते. पण आता पुन्हा एकदा नव्या उमेदीने सक्रीय झाले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता दिलीप वळसे-पाटील यांच्या नावावर एकमत झालं आहे.

दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती का झाली असावी?