Indian Independence Day: 15 ऑगस्ट ही तारीख स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडली गेली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Independence Day 2021: देशात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस आहे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी मधरात्रीच्या सुमारास आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. जाणून घ्या त्यामागची रोचक कथा काय आहे. तसंच आपल्याला याच दिवशी स्वातंत्र्य का मिळालं? हाच दिवस स्वातंत्र्य देण्यासाठी का निवडला गेला? यासारखे अनेक इंटरेस्टिंग आता आपण जाणून घेणार आहोत.

यापूर्वी 1930 ते 1947 पर्यंत 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सत्रात भारताने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर भारतीय नागरिकांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सविनय कायदेभंगाच्या चळवळीची विनंती केली होती.

त्यावेळी भारतात लॉर्ड माउंटबॅटन हे भारतातील व्हॉईसरॉय होते. माउंटबॅटन यांनीच वैयक्तिकरित्या 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून निश्चित केला होता. असे म्हटले जाते की, हा दिवस ते त्यांच्या कार्यकाळासाठी खूपच भाग्याचा आणि चांगला मानत असे. यामागील दुसरे विशेष कारण असे होते की, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, 15 ऑगस्ट, 1945 रोजी जपानी सैन्याने त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटनसमोर शरणागती पत्करली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

माउंटबॅटन तेव्हा सर्व देशांच्या सहयोगी सैन्याचे कमांडर होते. लॉर्ड माउंटबॅटन यांनी 3 जूनच्या स्वातंत्र्य आणि फाळणीच्या संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. 3 जूनच्या बैठकीत भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस देखील ठरवण्यात आला होता.

त्यानंतर स्वातंत्र्याच्या दिवसाची घोषणा देखील करण्यात आली होती. तेव्हा देशभरातील ज्योतिषांमध्ये प्रचंड रोष होता, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की, ज्योतिषीय गणनेनुसार 15 ऑगस्ट 1947 चा दिवस अशुभ आणि अमंगळ असा होता.

ADVERTISEMENT

त्यामुळे पर्याय म्हणून इतर तारखा देखील सुचविण्यात आल्या होत्या. पण माउंटबॅटन हे 15 ऑगस्ट या तारखेवरच अडून राहिले होते. त्यामुळे ज्योतिषांनी यावेळी एक मध्यम मार्ग शोधला होता.

ADVERTISEMENT

यावेळी 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीची वेळ सुचवण्यात आली. इंग्रजी परंपरेनुसार रात्री 12 नंतर नवीन दिवस सुरू होतो. दुसरीकडे, हिंदू धर्माच्या गणनेनुसार, नवीन दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते.

अभिजीत मुहूर्तामध्ये येणाऱ्या सत्ताबदलाचं संभाषण हे 48 मिनिटांच्या कालावधीत पूर्ण झालं पाहिजे यावर ज्योतिषी ठाम होते. हा मुहूर्त रात्री 11.51 पासून रात्री 12.15 पर्यंत होता. जो पूर्ण 24 मिनिटांचा होता. हे भाषण 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत द्यायचे होते. जवाहरलाल नेहरू या निर्धारित वेळेत भाषण देणार होते.

सुरुवातीला जून 1948 पर्यंत ब्रिटनकडून भारताला सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव होता. फेब्रुवारी 1947 मध्ये सत्ता हाती येताच लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय नेत्यांशी एकमत होण्यासाठी लगेच चर्चा सुरू केली. पण सर्व काही इतके सोपे नव्हते. विशेषत: जेव्हा विभाजनाच्या मुद्यावर जिना आणि नेहरू यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती.

कारण एक वेगळं राष्ट्र बनवलं जावं या मुद्द्यावर ठाम होते. याच मागणीमुळे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली उसळल्या होत्या आणि परिस्थिती दररोज अनियंत्रित होत होती. अर्थात, माउंटबॅटनला हे सर्व अपेक्षित नव्हते, म्हणून या परिस्थितीमुळे माउंटबॅटनला 1948 ऐवजी 1947 साली स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेणं भाग पडलं.

मोदींची घोषणा! १४ ऑगस्ट Partition Horrors Remembrance Day म्हणून पाळला जाणार

1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ब्रिटिश आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले होते आणि ते इंग्लंडमध्ये स्वतःचे राज्य चालवण्यासाठीही संघर्ष करत होते. असेही म्हटले जाते की, ब्रिटिश सत्ता जवळजवळ दिवाळखोरीच्या मार्गावर होती. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांची यांनी स्वातंत्र्यासाठी हाती घेतलेले कार्यक्रम याची त्यात महत्त्वाची भूमिका होती. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीपासून गांधी आणि बोस यांचे आंदोलन ब्रिटिश सरकारसाठी चिंतेचे कारण बनले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT