फडणवीसांचे लाडके असलेले गोपीचंद पडळकर सतत वादात का असतात?
गोपीचंद पडळकर हे भाजपममध्ये येण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते होते. वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना ऑक्टोबर 2019 या महिन्यात भाजपमध्ये आणलं आणि त्यांची भाजपमधली कारकीर्द सुरू झाली. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय खास आणि विश्वासू मानले जातात. आज घडीला पडळकर चर्चेत असण्याचं महत्त्वाचं कारण […]
ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकर हे भाजपममध्ये येण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते होते. वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी भाजपवर प्रचंड टीकाही केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना ऑक्टोबर 2019 या महिन्यात भाजपमध्ये आणलं आणि त्यांची भाजपमधली कारकीर्द सुरू झाली. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय खास आणि विश्वासू मानले जातात. आज घडीला पडळकर चर्चेत असण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी शरद पवारांच्या विरोधात केलेलं वक्तव्य. जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे शरद पवारांच्या हस्ते करण्यात येऊ नये अशी भूमिका घेत पडळकर यांनीच पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. तसंच शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचारी नेते, स्वार्थी नेते अशी विशेषणं वापरून टीकाही केली. हे फक्त आजचं चित्र नाही तर पडळकर भाजपमध्ये आल्यापासूनच सातत्याने वादग्रस्त ठरले आहेत.
2019 च्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त
ऑक्टोबर 2019 मध्ये गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीला रामराम करून भाजपमध्ये आले. देवेंद्र फडणवीस यांनी माझा वाघ बारामतीतून लढणार असं सांगत त्यांना अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून तिकिट दिलं. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत लढत दिल्यानंतर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की गोपीचंद पडळकर यांच्यावर ओढवली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 95 हजारांपेक्षा जास्त मतं मिळून ते विजयी झाले तर पडळकरांना फक्त 30 हजार मतं मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा उल्लेख वाघ म्हणून केला होता त्या वाघाला पराभवाची धूळ अजित पवारांनी चारली.
2019 च्या लोकसभेलाही पराभव