Uddhav Thackeray आणि भगतसिंह कोश्यारी यांची भेट टळली की टाळली?

मुंबई तक

आज सकाळपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे तिघेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत या बातम्या येत होत्या. 12 आमदारांबद्दल चर्चा होणार होती असंही स्पष्ट होत होतं. नुकताच 19 तारखेला लोकायुक्तांचा शपथविधी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल एकाच मंचावर दिसले. बारा आमदारांचा विषय झाला होता. त्यावेळी आईये चाय पिते हैं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज सकाळपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे तिघेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत या बातम्या येत होत्या. 12 आमदारांबद्दल चर्चा होणार होती असंही स्पष्ट होत होतं. नुकताच 19 तारखेला लोकायुक्तांचा शपथविधी झाला. त्यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपाल एकाच मंचावर दिसले. बारा आमदारांचा विषय झाला होता. त्यावेळी आईये चाय पिते हैं असं राज्यपाल म्हणाले होते.

त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी ठरवलं की राज्यपालांना भेटू. गुरूवारी कॅबिनेट बैठकीनंतर भेट होईल असं ठरलं. मुख्यमंत्र्यांनी फोन करून वेळ मागितली होती. ती वेळही देण्यात आली होती. मात्र राज्यपालांची आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांची भेट झाली नाही. राज्यपाल उद्या दिल्लीला जाणार आहेत. ते दोन दिवस दिल्लीत असणार आहेत. त्यामुळे सोमवारी ते परत येतील. मात्र त्यानंतर ही भेट कधी होईल ते सांगता येणार नाही. राज्यपालांनी स्वतः सांगितलं होतं की भेट होईल. पण राज्यपालांना भेट टाळत आहेत ही चर्चा सुरू झाली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये बारा आमदारांची यादी राज्यपालांकडे गेली होती. ती अजूनही मान्य करण्यात आलेली नाही. हे सगळं प्रकरण कोर्टातही गेलं होतं. पण कोर्टही चर्चा करून प्रश्न सोडवा इतकंच सांगू शकलं. बारा आमदारांचं काय होणार हा प्रश्न गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरूद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातून विस्तव जात नाही अशीही स्थिती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp