महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर
महाराष्ट्रात Lockdown 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर काय होणार हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच पडला आहे. महाराष्ट्रातला लॉकडाऊन संपणार की वाढणार? हा तो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावण्यात आला असला तरीही […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात Lockdown 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर काय होणार हा प्रश्न आपल्याला सगळ्यांच पडला आहे. महाराष्ट्रातला लॉकडाऊन संपणार की वाढणार? हा तो प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रूग्णसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावण्यात आला असला तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी, मिनी लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशाला बसला आहे आणि सर्वाधिक महाराष्ट्राला बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊन आणखी किमान 15 दिवस तरी असण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही मुंबई तकशी बोलताना हेच मत व्यक्त केलं आहे.
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
काय म्हणाले आहेत शशांक जोशी?
महाराष्ट्रात लॉकडाऊन इतक्यात उघता येणार नाही. मुंबईत सध्या रिकव्हरी चांगली होताना दिसते आहे मात्र महाराष्ट्रात असं चित्र नाही. महाराष्ट्रातले 13 ते 14 जिल्हे आहेत जिथे रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र महाराष्ट्रातलं संकट पूर्णपणे टळलेलं नाही. आणखी किमान 15 दिवसांचे निर्बंध हे असतील असं मला वाटतं. त्याबाबत आता सरकार विचार करून निर्णय घेईल. जेव्हा अनलॉक होईल तेव्हा मात्र मास्क घातला नाही, सॅनेटायझेशन केलं नाही किंवा अंतर बाळगलं नाही तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त दंड घेतला जावा. महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो.