Raj Thackeray: राज ठाकरेंचं ‘ते’ वक्तव्य पक्षाला भोवणार?

मुंबई तक

मिथिलेश गुप्ता, कल्याण: गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचं हे वक्तव्य पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्य एका मनसे पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे. ’16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: गुढीपाडवा मेळाव्यात शिवतिर्थावरील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचं हे वक्तव्य पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्य एका मनसे पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली आहे.

’16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं.’ अशी भावनिक पोस्ट इरफान शेख या पदाधिकाऱ्याने टाकली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानवर नाराजी व्यक्त करत लवकरच मुस्लिम पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं इरफान शेख यांनी सांगितलं आहे.

‘आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आले.’ असे इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या भावनिक पोस्टविषयी शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? पक्षात नेमके चाललंय काय? 2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती.’

हे वाचलं का?