ठाकरे बंधू एकत्र येणार का? दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला एक वेगळं वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा, यांची किर्ती अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहचत असे. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुतणे राज ठाकरे. शिवसेनेतल्या अस्वस्थेला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर 9 […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या आडनावाला एक वेगळं वलय आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दबदबा, यांची किर्ती अवघा महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहचत असे. त्यांच्या पुढची पिढी म्हणजे त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पुतणे राज ठाकरे. शिवसेनेतल्या अस्वस्थेला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर 9 मार्च 2006 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रात एक प्रश्न मराठी माणसाच्या मनात कायम आहे तो म्हणजे ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दिलं आहे.
लोकसत्ता या दैनिकाच्या कार्यक्रमातील एका विशेष मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी हाच प्रश्न विचारला. तमाम मराठी माणसाच्या मनात एक प्रश्न तुम्हा दोन बंधूंविषयी आहे. तो प्रश्न हाच आहे की तुम्ही एकत्र येणार का? असा प्रश्न गिरीश कुबेर यांनी विचारला आणि राज ठाकरेंनी त्यावर एकच उत्तर दिलं आणि ते होतं परमेश्वर जाणे! याचाच अर्थ की आम्ही कधी एकत्र येऊ का? हे आत्ता काहीच सांगता येत नाही असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!