पेरुच्या शेतीतून गवसला यशाचा मार्ग, नगरच्या तरुण शेतकऱ्याच्या धाडसाची सर्वत्र चर्चा
– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यातला शेतकरी हा दुष्काळामुळे संपूर्णपणे पिचला आहे. कधी सुका दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. परंतू महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी परिस्थितीवर मात करुन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत वेगळे प्रयत्न करत आहेत. अहमदनगरच्या दैठणे गुंजाळ येथील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ यांनी पेरुच्या […]
ADVERTISEMENT

– रोहित वाळके, अहमदनगर प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्यातला शेतकरी हा दुष्काळामुळे संपूर्णपणे पिचला आहे. कधी सुका दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचं चांगलंच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. परंतू महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी परिस्थितीवर मात करुन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत वेगळे प्रयत्न करत आहेत.
अहमदनगरच्या दैठणे गुंजाळ येथील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ यांनी पेरुच्या शेतीमधून दीड महिन्यांत ४० लाखांचं उत्पन्न कमावलं आहे.
इतरांपेक्षा वेगळा विचार करुन फळशेतीकडे वळलेल्या गुंजाळ यांच्या धाडसाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. गुंजाळ यांनी १० एकर जमिनीत तैवान जातीच्या पेरुच्या ८ हजार झाडांची लागवड केली. यासाठी गुंजाळ यांना ८ लाखांचा खर्च आला. या पेरुला दुबई, बांगलादेश, कोलकाता, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते.