वाशिममधल्या बंदलाही हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड

मुंबई तक

त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याविरोधात अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागलं असतानाच आता वाशिममध्येही तशीच घटना घडली. वाशिमच्या कारंजा जिल्ह्यात असलेल्या मुस्लिम बहुल भागातली दुकानं पूर्णपणे बंद होती. मात्र वाशिममध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवली नव्हती. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागलं. बंद करणाऱ्या आंदोलकांनी ज्या लोकांनी दुकानं बंद ठेवली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याविरोधात अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागलं असतानाच आता वाशिममध्येही तशीच घटना घडली. वाशिमच्या कारंजा जिल्ह्यात असलेल्या मुस्लिम बहुल भागातली दुकानं पूर्णपणे बंद होती. मात्र वाशिममध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवली नव्हती. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागलं.

बंद करणाऱ्या आंदोलकांनी ज्या लोकांनी दुकानं बंद ठेवली नव्हती त्यावर दगडफेक केली. त्यामुळे काही दुकानांच्या काचा फुटल्या. तसंच इतर साहित्याचंही नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातले व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अमरावतीत बंदला हिंसक वळण

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp