सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून Mask उतरवायचा आहे, पण… CM उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य
आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या […]
ADVERTISEMENT

आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ चं आयोजन करण्यात आलं . या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली गेली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?










