बंगालमधील हिंसाचारात 8 जणांचा हकनाक बळी, ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
बीरभूम (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला आहे. येथे संतप्त जमावाने सुमारे डझनभर घरे पेटवून दिली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय हिंसाचारावरून भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप […]
ADVERTISEMENT

बीरभूम (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार भडकला आहे. येथे संतप्त जमावाने सुमारे डझनभर घरे पेटवून दिली. या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. राज्यात होत असलेल्या राजकीय हिंसाचारावरून भाजपने ममता सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांचे शिष्टमंडळ आज रामपूरहाटमधील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देणार आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही या प्रकरणी स्वतःहून दखल घेतली आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. जाणून घेऊया रामपूरहाटमध्ये हिंसाचार का पसरला आणि तेथील लोकं आता स्थलांतर का करत आहेत?
हिंसाचार कसा पसरला?
बीरभूमच्या रामपूरहाटमध्ये झालेल्या हिंसाचारामागे टीएमसी नेत्याच्या हत्येचे कारण असल्याचे बोलले जात आहे. TMC पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी रामपूरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. यानंतर संतप्त जमावाने डझनहून अधिक घरांना आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे.