शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय घडलं? सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं उत्तर

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी राष्ट्र मंचच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत अनेक नेत्यांची उपस्थिती होती. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं? मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीची ही सुरूवात आहे का? शरद पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात स्वतःला आजमावू पाहात आहेत का? असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. यशवंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी राष्ट्र मंचच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत अनेक नेत्यांची उपस्थिती होती. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं? मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीची ही सुरूवात आहे का? शरद पवार हे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात स्वतःला आजमावू पाहात आहेत का? असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी याबाबत माहितीही दिली. या बैठकीत सुधींद्र कुलकर्णीही उपस्थित होते. सुधींद्र कुलकर्णी यांनी याबाबत काय सांगितलं जाणून घेऊ.

या बैठकीचा अजेंडा काय होता?

मंगळवारी शरद पवार यांच्या घरी झालेली बैठक ही विरोधी पक्षांची बैठक नव्हती. ही बैठक राष्ट्र मंच नावाची संघटना आहे त्यांच्यातर्फे ही बैठक बोलवण्यात आली होती. शरद पवार हे मेंटॉर अर्थात मार्गदर्शक आहेत. त्यामुळे ही बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली गेली. दुसरी आघाडी, तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी बैठक होती अशीही चर्चा होती. मात्र असंही काही नव्हतं. भाजप किंवा काँग्रेसशिवाय पर्याय देण्यासाठी ही बैठक नव्हती. मोदींच्या विरोधात व्यूहरचना करण्यासाठी ही बैठक होती का तर त्याचं उत्तरही नाही असंच आहे.

या बैठकीचं मुख्य उद्दीष्ट सांगतो. यशवंत सिन्हा हे तीस वर्षांपासून अधिक काळ भाजपचे नेते होते. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यशवंत सिन्हा भाजपमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्र मंच संघटना स्थापन केली. आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नॉन पार्टी बट पॉलिटिकल असा एक राष्ट्र मंच स्थापन केला. राष्ट्रीय समस्यांबद्दल विचार करण्यासाठी आणि अजेंडा तयार करण्यासाठी हा मंच स्थापन करण्यात आला आहे. मुंबईतही या मंचाच्या अनेक बैठका झाल्या आहेत. कोव्हिड काळ असल्याने मागच्या दीड वर्षात राष्ट्रीय मंचाची बैठक होऊ शकली नाही. ती घ्यायची ठरली त्यावेळी शरद पवार यांनी सांगितलं की दिल्लीत बैठक घ्या आणि माझ्या निवासस्थानी बैठक घ्या. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी याची वेगवेगळ्या प्रकारे बातमी दिली. मीडियाला या निमित्ताने चांगला विषय मिळाला. मी़डियाने त्यांच्या पद्धतीने अंदाज बांधले. मात्र बैठक हे देशातल्या गंभीर प्रश्नांबाबत विचार करण्यासाठी झाली. विविध पक्षांचे नेते आणि राजकीय कार्यकर्ते अशा लोकांची बैठक झाली. या बैठकीत खूप चांगली आणि सकारात्मक बैठक झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp