एसटी आंदोलन: गुणरत्न सदावर्तेंचा पाय खोलात, सातारा पोलिसांना का हवा आहे ताबा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. ज्यानंतर आज आता पुन्हा एकदा कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. असं असताना आता सातारा पोलिसांनी देखील सदावर्ते यांचा ताबा मिळविण्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात एक जुना गुन्हा दाखल असल्याने त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा पोलिसांनी सकाळपासूनच फिल्डींग लावली आहे. मात्र कोर्टाने त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली असल्याने तूर्तास तरी सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळू शकणार नाही.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे गेल्या दोन दिवसापासून पोलीस कोठडीत होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जर कोर्टाने सदावर्तेंची कोठडी फेटाळल्यास सातारा पोलीस त्यांचा ताबा मिळविण्यासाठी सज्ज होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

साताऱ्यात कोणत्या प्रकरणात सदावर्तेंवर गुन्हा?

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान, सातारा पोलिसांनीही या प्रकरणात सदावर्ते यांचा ताबा मिळावा यासाठी सातारा पोलिसांनी कोर्टासमोर अर्ज केला असून या अर्जावरही 13 तारखेला सुनावणी होणार असल्याचं कळतं आहे.

ADVERTISEMENT

सदावर्तेंवर अकोल्यातही गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांसाठी न्यायालयीन लढा उभारण्यासाठी सदावर्तेंनी तीनशे ते पाचशे रूपये अवैधपणे जमा केल्याच्या आरोपावरुनही गुन्ह्याची नोंद झाली आहे.

राज्याचे एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये जानेवारी महिन्यातच या संदर्भात तक्रार देण्यात आली होती. आता या संदर्भात अकोट आगारातील एसटी आंदोलकांनी काही कर्मचाऱ्यांचे 74 हजार चारशे रुपये औरंगाबादचे अजय कुमार गुजर यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याचा दावा केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात औरंगाबादचे अजय कुमार गुजर गुणवंत सदावर्ते, जयश्री पाटील आणि प्रफुल गावंडे यांच्याविरुद्ध कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कोर्टात नेमकं घडलं?

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादात असं म्हटलं आहे की, आंदोलनाच्या दिवशी सकाळी 10 वाजून 33 मिनीटांनी सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना आंदोलनाबद्दल माहिती दिली. यानंतर त्यांना नागपूरवरुन एक फोन आला. सदावर्तेंच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यात त्यांना पत्रकार पाठवा असा संदेश देण्यात आला.

नागपूरवरुन फोन, सदावर्तेंना आलेला तो मेसेज आणि…जाणून घ्या आज कोर्टात काय घडलं?

या आंदोलनाला आर्थिक सहाय्य कुठून मिळालं याचा तपास करण्यासाठी सदावर्तेंची कस्टडी मिळणं गरजेचं आहे. सदावर्ते म्हणतात की, त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून त्यांची बाजू मांडण्यासाठीचे पैसे घेतले नाहीत. परंतू प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 550 रुपये गोळा करण्यात आले जी रक्कम 1 कोटी 80 लाखांच्या घरात गेली. त्यामुळे या पैशांचा वापर कसा झाला याचाही तपास होणं गरजेचं असल्याचं घरत यांनी कोर्टासमोर सांगितलं.

सदावर्ते यांनी 31 मार्च 2022 पासून आपल्या मोबाईलवरचा डेटा उडवलेला आहे. याचा अर्थ त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे असाच होतो. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मोहम्मद ताजीउद्दीन शेख याच्या मोबाईलमध्ये एक बॅनर मिळालं आहे ज्यात सावधान शरद पवार असा मेसेज लिहीलेला दिसतो आहे. या बॅनरवर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीचा फोटो असल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टासमोर सांगितलं.

बचाव पक्षाचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी हे आरोप फेटाळले. ‘कर्मचाऱ्यांना माहिती आहे की मी सर्विस प्रोवाईडर आहे. या देशात हे नेमकं चाललंय तरी काय? कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख रुपये गोळा केले हे सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. काही क्षणांसाठी असा विचार करु की सदावर्ते यांनी खरंच पैसे घेतले आहेत. पण ज्या लोकांनी हे पैसे दिले आहेत त्यांची काही तक्रार आहे का? जी लोकं या प्रकरणात त्रास भोगत आहेत, आत्महत्या करत आहेत त्यांच्याप्रती आपण जरा संवेदना ठेवूयात.’

‘ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला असं पोलिसांचं म्हणणं आहे तिकडे कोणत्याही प्रकारे मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे जर नुकसान झालेलं नसेल तर हे सेक्शन्स लावण्याचं कारणच नाही. सदावर्ते हे आत असले किंवा बाहेर असले तरीही या प्रकरणाचा तपास सुरु राहू शकतो.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT