राज ठाकरेंना का घ्यावी लागतेय ‘उत्तर’ सभा.., भोंग्यावरुन मनसेमध्ये नेमकं चाललंय काय?
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कवरुन केलेल्या भाषणात कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, जिथे कुठे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरु असेल तिथे त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि त्यावर हनुमान चालीसा लावायचा. खरं म्हणजे राज ठाकरेंचा हा सरळसरळ आदेशच आहे. पण असं असताना […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कवरुन केलेल्या भाषणात कट्टर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, जिथे कुठे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरु असेल तिथे त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि त्यावर हनुमान चालीसा लावायचा. खरं म्हणजे राज ठाकरेंचा हा सरळसरळ आदेशच आहे. पण असं असताना देखील मनसे पक्षातच राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन किंवा भूमिकेवरुन नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विरोधक देखील त्यांच्यावर या मुद्दावरुन सडकून टीका करत आहेत. याच सगळ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आता राज ठाकरे 9 एप्रिल रोजी ठाण्यात ‘उत्तर’सभा घेणार आहेत.
खरं म्हणजे राज ठाकरे यांनी एकदा आदेश दिला की, तो मनसैनिकांसाठी अंतिम असतो. पण मशिदींवरील भोंग्याच्या भूमिकेवरुन मनसेमध्येच चलबिचल पाहायला मिळत आहे. अशावेळी या सगळ्याला ‘उत्तर’ देण्यासाठी राज ठाकरे हे पुन्हा ठाण्यात सभा घेणार आहेत.
सगळ्यात आधी जाणून घेऊयात उत्तर सभेबाबत मनसेने काय भूमिका घेतली आहे:
राज ठाकरे हे ठाण्यात उत्तर सभा नेमकी का घेणार आहेत याबाबत मनसेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन माहिती दिली आहे.