लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणाली पळून जाणार; 12 वर्षांनी 3 मुलांना सोडून प्रियकरासोबत फरार
-विकास राजूरकर, चंद्रपूर तीन मुलं झाल्यानंतर महिला प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे उघडकीस आली आहे. पत्नी पीडित पतीने पत्रकार परिषद घेऊन सगळी घटना सांगत पत्नी 5 तोळे सोने, २० तोळे चांदीचे दागिने व एक लाख रुपये घेऊन गेली असल्याचा आरोप केला आहे. चिमूर तालुक्यात असलेल्या भिसी येथील वामन मेश्राम यांचा 2009 मध्ये […]
ADVERTISEMENT

-विकास राजूरकर, चंद्रपूर
तीन मुलं झाल्यानंतर महिला प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे उघडकीस आली आहे. पत्नी पीडित पतीने पत्रकार परिषद घेऊन सगळी घटना सांगत पत्नी 5 तोळे सोने, २० तोळे चांदीचे दागिने व एक लाख रुपये घेऊन गेली असल्याचा आरोप केला आहे.
चिमूर तालुक्यात असलेल्या भिसी येथील वामन मेश्राम यांचा 2009 मध्ये नागपूर जिल्ह्यातील भिवापुर तालुक्यातील नांद गावातील शोभाबाई चाचरकर यांची मुलगी निकिता हिच्याशी विवाह झाला होता. हा विवाह तिची आत्या ललिता डाहारे (रा. किरमिटी मेंढा) यांच्या घरी झाला होता.
लग्नानंतर दिली पळून जाण्याची धमकी