एसटीचं सरकारमधे विलीनीकरण होणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले..

मुंबई तक

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. अशात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी संपासह विविध विषयांवर भूमिका मांडली. एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याबाबत आणि इतर मुद्द्यांबाबतही शरद पवारांनी भूमिका मांडली. राज्यात एसटीचा संप अद्याप मिटलेला नाही. परिवहन मंत्री अनिल परब हे बैठका घेत आहेत. सरकारकडून संप मिटण्यासाठी कसोशीचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. अशात आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी संपासह विविध विषयांवर भूमिका मांडली. एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याबाबत आणि इतर मुद्द्यांबाबतही शरद पवारांनी भूमिका मांडली. राज्यात एसटीचा संप अद्याप मिटलेला नाही. परिवहन मंत्री अनिल परब हे बैठका घेत आहेत. सरकारकडून संप मिटण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. आज याच सगळ्या विषयांवर शरद पवारांनी भाष्य केलं.

एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत

विलीनीकरण होईल का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले..

‘कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरण करण्याची मागणी केली जाते आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. या समितीने निर्णय़ घेण्याचं ठरवलं आहे. समितीच्या शिफारसींवर सरकार गांभीर्याने विचार करेल. सध्या राज्यात 96 हजार एसटी कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या एकूण शासकीय कर्मचाऱ्यांशिवाय अन्य आरोग्य खात्यातील कर्मचारी, आशा वर्कर्स, एसटी कर्मचारी, राज्यातील इतर कर्मचारी हे सरकारी कर्मचारी नाहीत. तरीही ते सरकारशी संबंधित आहेत. एकदा विलीनीकरणाचं सूत्र अवलंबलं तर ते सर्वांना लागू होईल. त्याचं आर्थिक गणित काय असेल याचा विचार करावा लागेल.’ असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp