भोंग्यांसाठीच्या नियमांसाठी ठाकरे सरकार घेणार २०१५ च्या नियमावलीचाच आधार?

मुंबई तक

मशिदींवरच्या भोंग्यांवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले असून याचे पडसाद देशभरात उमटत असताना दिसत आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात धार्मिक दंगली पेटू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात आणि त्यानंतर घेतलेल्या उत्तर सभेत ही मागणी केली होती. १२ एप्रिलच्या सभेत तर त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटच दिला. या सगळ्यामुळे भोंग्यांवरून नियमावली तयार करण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मशिदींवरच्या भोंग्यांवरुन महाराष्ट्रात राजकारण पेटले असून याचे पडसाद देशभरात उमटत असताना दिसत आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात धार्मिक दंगली पेटू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात आणि त्यानंतर घेतलेल्या उत्तर सभेत ही मागणी केली होती. १२ एप्रिलच्या सभेत तर त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटच दिला.

या सगळ्यामुळे भोंग्यांवरून नियमावली तयार करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. तसंच हा विषय फारसा मोठा नाही. यावरून कुणीही कायदा हातात घेऊ नये असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. अशात भोंग्याबाबत २०१५ मध्ये जी नियमावली काढण्यात आली होती त्याचीही चर्चा होते आहे. ही नियमावली काय आहे तेच आम्ही मुंबई तकच्या वाचकांना सांगणार आहोत. कारण नव्याने तयार होणारी नियमावली याच नियमावलीवर आधारित आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम

हे वाचलं का?

    follow whatsapp