‘…म्हणून आपल्यावर ही वेळ आलीये’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह बंडखोर आमदारांवर घणाघात

मुंबई तक

युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेला सुरूवात झाली. शिव संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकेची तोफ डागली. भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे? भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “२० जूनपासून २० जुलैपर्यंत महाराष्ट्रात वेगळं वातावरण होतं, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेला सुरूवात झाली. शिव संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकेची तोफ डागली.

भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “२० जूनपासून २० जुलैपर्यंत महाराष्ट्रात वेगळं वातावरण होतं, दुःखी वातावरण होतं. हे स्वतःचं दुःख विसरुन जाण्यासाठी मी हा शिव संवाद दौरा सुरू केला आहे. तुमच्याशी संवाद करायला. तुमचे आशिर्वाद घ्यायला. जे काही चित्र मी बघत होतो, ते क्लेशदायक आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मतदार म्हणून, शिवसैनिक म्हणून आपण सर्वांनी जवळून बघितलं आहे. ज्यांना आपण ओळख दिली. पुढे आणलं, तिकीट दिली, मंत्रिपदं दिली. जे करु शकत होतो, ते केलं. ते केल्यानंतरही ते आपल्याला सोडून गेले. धोका देऊन निघून गेले. गद्दारी करून सोडून गेले,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी भिवंडीत बोलताना केली.

“तरुण मित्र-मैत्रिणींना मला विचारायचं आहे की, गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात जे राजकारण सुरूये. जी काही सर्कस सुरूये. हे राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? लोकशाही म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? यांना काय कमी केलं?”

हे वाचलं का?

    follow whatsapp