“नीच आणि निर्लज्ज प्रकार!” पक्षचिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवला आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत असतानाच आदित्य ठाकरे यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेवर आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला होता. ज्यानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने यासंदर्भात उशिरा निर्णय देत […]
ADVERTISEMENT

शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवला आहे. याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत असतानाच आदित्य ठाकरे यांची संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेवर आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला होता. ज्यानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला होता. निवडणूक आयोगाने यासंदर्भात उशिरा निर्णय देत शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी?
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते! या ओळी ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा म्हणजेच त्यांच्या आजोबांचा फोटोही ट्विट केला आहे.
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022
२१ जूनला शिवसेनेत सर्वात मोठं बंड
21 जूनला महाराष्ट्रात जे बंड झालं त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतल्या ४०आमदारांचा गट आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर उद्धव ठाकरे नव्या जोमाने कामाला लागले. आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढून आपलं म्हणणं मांडत लोकांना भावनिक आव्हान केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गटाचा उल्लेख गद्दार असाच केला. मात्र दोन गटातले जे वाद निवडणूक आयोगासमोर गेला होता त्यानंतर हा निर्णय आला. आता आदित्य ठाकरे यांना संताप अनावर झाला आहे हेच त्यांचं ट्विट दर्शवतं आहे.