Navneet Rana: रवी राणा-बच्चू कडू वादावर पहिल्यांदा भाष्य, मतभेद सोडून एकत्र येण्याचं आवाहन

मुंबई तक

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद संपला असं वाटत असतानाच तो वाद पुन्हा पेटला. बुधवारी रवी राणा यांनी बच्चू कडूंना आव्हान दिलं. तर बच्चू कडू यांनी प्रतिआव्हान दिलं. अशात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या वादात पडत दोघांनाही वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे. बच्चू कडू आक्रमक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद संपला असं वाटत असतानाच तो वाद पुन्हा पेटला. बुधवारी रवी राणा यांनी बच्चू कडूंना आव्हान दिलं. तर बच्चू कडू यांनी प्रतिआव्हान दिलं. अशात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या वादात पडत दोघांनाही वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे.

बच्चू कडू आक्रमक होताच मिळालं फळ! शिंदे-फडणवीसांनी मंजूर केला ५०० कोटींचा प्रकल्प

काय म्हटलं आहे नवनीत राणा यांनी?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कडू व रवि राणा यांच्या वादात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील विकासाचं नुकसान होतं आहे तरी दोघांनी आपसात वाद न करता समोपचाराने हे प्रकरण घ्यावं. गेल्या अडीच वर्षात आपले सरकार नसल्याने नुकसान झाले पण आता आपल्या विचारांचे सरकार आलं आहे. आपल्याला आता विकास करायचा आहे तेव्हा जिल्ह्याची खासदार म्हणून दोन्ही आमदरांना विनंती करते हे वाद थांबवा. असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले, त्यांच्यावर आरोप…”

हे वाचलं का?

    follow whatsapp