भाजप खासदार चिखलीकरांनी मानले अशोक चव्हाणांचे आभार, म्हणाले फ्लोअर टेस्ट…

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रतापराव चिखलीकर (Prataprao Chikhalikar) हे महाराष्ट्रातील नांदेडमधील भाजपचे खासदार आहेत. आता भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आघाडी सरकार पाडले असताना नांदेडचे खासदार महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे मूळचे नांदेडचे असून ते आमदार आहेत.

2019 पासून भाजप खासदार आणि काँग्रेस आमदारांनी कधीही कोणत्याही विषयावर टीका केली नाही. 2019 मध्ये लोकसभेच्या पराभवानंतर अशोक चव्हाण खूपच कडवट झाले असल्याचे चिखलीकर सांगतात. “त्यांना वाटतं की मी त्यांचा पराभव केला. परंतु त्यांच्या हे लक्षात आले नाही की लोकांनीच आपल्या विरोधात मतदान केलं आणि तेव्हापासून त्यांनी ते खूप वैयक्तिक बनवलं आहे.” असे चिखलीकर म्हणाले.

इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना भाजपचे खासदार म्हणाले की, त्यांचा मतदारसंघ खड्ड्यांनी भरलेला असल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार आणि पीडब्ल्यूडी विभागाने मतदारसंघातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी काहीही केले नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“नांदेडमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि माझ्या भागातील सत्य समोर आणणे ही माझी जबाबदारी आहे. खासदार म्हणून मी माझ्या क्षमतेनुसार काम केले आहे, परंतु नांदेडमधील खड्डे बुजवण्याचे काम राज्यसरकारचे आहे. हे राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते आहेत असे चिखलीकर म्हणाले आहेत.

खासदार या नात्याने राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे चिखलीकर म्हणाले. नितीन गडकरींनी 561 किमीचा राष्ट्रीय महामार्ग बनवला जो याआधी कोणीही केला नाही. पण रस्ते हा राज्याचा विषय असून काँग्रेसच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडीने त्याची काळजी घ्यायला हवी होती असेही चिखलीकर म्हणाले.

ADVERTISEMENT

तुम्ही काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना दोष देत आहात का असे विचारले असता ते म्हणाले, “मला त्यांचे नाव घेण्याचीही गरज नाही. ही त्यांची सवय आहे. ते काम कमी करतात आणि बोलतात जास्त. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी काहीही केले नाही. त्यांनी महापालिकेत काहीही केले नाही आणि लोकांना सत्य काय आहे ते माहित आहे असे मत यावेळी चिखलीकरांनी व्यक्त केले.

ADVERTISEMENT

पुढे चिखलीकर म्हणाले ‘’त्याच्याकडे एक गोष्ट आहे की ते विरोधकांना मान देत नाही. म्हणूनच मी त्यांच्या कोणत्याही बैठकीला गेलो नाही. मात्र आता आम्ही नांदेडच्या जनतेला त्रास होऊ देणार नाही आणि ग्राउंड झिरोवर बदल घडवून आणण्याची विनंती देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत.’’

संभाजीनगरला औरंगजेबाचे नाव देण्याचा निर्णय झाला तेव्हा अशोक चव्हाण मंत्रिमंडळात उपस्थित होते, असेही भाजपचे खासदार म्हणाले. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध होता पण अशोक चव्हाणांनी विरोध केला नाही म्हणून मी त्यांचे आभार मानू इच्छितो. तसेच ते विश्वासदर्शक ठरावासाठी उपस्थित नव्हते त्यामुळेही मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी भाजपला पाठिंबा देत राहावे आणि मला वाटते की असेच चालू राहिल्यास मी त्यांनाही जाऊन भेटेन आणि केवळ तेच नव्हे तर नांदेडचे चार आमदार विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे ते सहकार्य करत राहिल्यास मी पाहीन आणि त्यांच्यासोबत काम करण्याचाही प्रयत्न करेन.” असे चिखलीकर म्हणाले

    follow whatsapp

    ADVERTISEMENT