राज्यसभा निवडणुकीत महाडिक जिंकणार, मोठा नेता पडणार; पाटलांनी महाविकास आघाडीला दिला प्रस्ताव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

‘राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीनं त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा त्यांचा मोठा उमेदवार पडू शकतो.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांचा हे वक्तव्य म्हणजे शिवसेनेच्या संजय राऊतांना इशारा तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीनही उमोदवार विजयी होणार असल्याची खात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसंच या निवडणुकीत भाजप घोडेबाजार करणार नाही. महाविकास आघाडीनं त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा एखाद्या मोठ्या पक्षाचा मोठा उमेदवार पराभूत होऊ शकतो. असा इशाराही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यानं घोडेबाजार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यात सहाव्या जागेसाठी निवडणूक रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांना विजयासाठी 10 ते 12 मतांची गरज असल्यामुळं, घोडेबाजार होण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र, या निवडणुकीत भाजप घोडेबाजार करणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

“राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचे तीनही उमेदवार निवडून येणार आहेत. भाजपाने याबद्दल नियोजन केलं आहे. त्यासाठी निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार करणार नाही. सहाव्या जागेवरुन आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी भाजपचे धनंजय महाडिक हे १०० टक्के निवडून येणार, तर आघाडीतील बडा नेता नेता पडणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने आमच्यासोबत चर्चा करुन त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटलांच्या एक मोठा नेता पडू शकतो, या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवाल्या गेल्या. चंद्रकांत पाटील यांचा रोख हा शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांच्याकडे तर नव्हता ना? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

राज्यसभा निवडणूक 2022 : महाविकास आघाडी की भाजप… कुणाकडे आहे जास्त संख्याबळ?

राज्यसभा निवडणुकीचं नेमकं गणित काय?

महाविकास आघाडी – १६९ आमदार (शिवसेना ५५ + राष्ट्रवादी ५३ + काँग्रेस ४४ + इतर पक्ष ८ + अपक्ष ८)

भाजप – ११३ आमदार (भाजप १०६ + रासप-जनसुराज्य प्रत्येकी १-१ + अपक्ष ५)

* शिवसेनेच्या विधानसभेत ५६ जागा आहेत, परंतू आमदार लटके यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे.

राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी एक निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा + १ या सूत्रानुसार खासदार निवडून येतात. ज्यामुळे प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ४२ मतांची गरज लागणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे सहावी जागा लढवण्यासाठी लागणारी आकडेमोड महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेना आपली जागा निवडून आणणार आहे. परंतू तिन्ही पक्षांचा एक-एक उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे २६ मतं उरतात त्यामुळे उरलेल्या मतांसाठी त्यांना अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. अपक्षांनी साथ दिल्यास सहावी जागा महाविकास आघाडी सहज निवडून आणू शकते.

दुसरीकडे भाजपही या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवेल असं दिसंतय. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला राज्यसभेत आपलं बहुमत अबाधित राखायचं आहे. त्यामुळे दोन जागा निवडून आल्यानंतर भाजपकडे २२ मत शिल्लक राहतात आणि त्यांना इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ७ आमदारांचा पाठींबा आहे. ज्यामुळे भाजपकडे सहाव्या जागेसाठी २९ मत तयार असून त्यांना उर्वरित १३ मतांसाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT