लवकरच बिहारलाही जेडीयू मुक्त करु : खासदार मोदींचा सुचक इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाटना : भाजपची साथ सोडून एका रात्रीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन करणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने सलग दुसरा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेश पाठोपाठ मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षातील 5 आमदारांना फोडून भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे देश पातळीवरील राजकारण करत असलेल्या नितीश कुमार यांच्या जदयूला हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, जेडीयुला दिलेल्या या धक्क्यावर राज्यसभा खासदार आणि बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी आता लवकरच बिहारलाही जेडीयू मुक्त करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अरुणाचल प्रदेश पाठोपाठ आता मणिपूरही जेडीयूमुक्त झाले आहे. या सर्व आमदारांना एनडीएमध्ये राहायचे होते. आता लवकरच आम्ही बिहारमधीलही जेडीयू-आरजेडी युती संपुष्टात आणून राज्याला जेडीयूमुक्त करु. तसेच नितीश कुमार यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, “होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावून कोणताही नेता पंतप्रधान बनू शकत नाही.”

JD(U)MLAs : 2024 च्या तयारीला लागलेल्या नितीश कुमारांना भाजपने दिला आणखी एक झटका!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

MLAs join BJP : जदयूला मणिपूरमध्ये झटका

मणिपूर विधानसभेचे सचिव मेघजीत सिंह यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जदयूच्या पाच आमदारांचा भाजपातील प्रवेश स्वीकृत करण्यात आला आहे. घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार स्वीकारलं गेलं आहे.

मणिपूरमध्ये याच वर्षी (२०२२) विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. जदयूने ३८ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ६ जागांवर जदयूचे उमेदवार जिंकले. मात्र, आता सहापैकी ५ आमदार भाजपत गेले आहेत. त्यामुळे जदयूला हा मोठा झटका मानला जात आहे.

ADVERTISEMENT

जदयूच्या कोणत्या आमदारांनी भाजपत प्रवेश केला?

जनता दलाच्या (संयुक्त) ज्या पाच आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे, त्यांची नावं केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछबउद्दीन, पोलीस महासंचालक राहिलेले आमदार एएम खाऊटे आणि थांगजाम अरुण कुमार अशी आहेत.

ADVERTISEMENT

बिहारचा वचपा भाजपने ईशान्येत काढला : नितीशकुमारांचा अख्खा पक्षच संपवला…

अरुणाचल प्रदेशमध्येही नितीश कुमारांना झटका :

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशही असाच झटका जदयूला बसला. २०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाने १५ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी जदयूचे ७ उमेदवार निवडून आले होते.

मात्र, ७ पैकी ६ आमदारांनी डिसेंबर २०२० मध्ये म्हणजेच जदयू आणि भाजपचं बिहारमध्ये सरकार असतानाच भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर उरलेल्या एका आमदारांनेही काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT