पहिल्या पतीला सोडलं, दुसऱ्याला तक्क्याने मारलं, बॉडी फेकायला चौथा प्रियकर, भयंकर कांड!
Crime News : अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकरांच्या मदतीने निर्घृण हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पहिल्या पतीला सोडलं, दुसऱ्याला तक्क्याने मारलं
बॉडी फेकायला चौथा प्रियकर, भयंकर कांड!
Crime News :गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात धांगध्रा येथील एका कालव्यात (कॅनाल) शांतीगिरी गोस्वामी नावाच्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्या वेळी स्थानिक पोलिसांनी हा एक आकस्मिक मृत्यू असल्याचे मानून या प्रकरणाची फाईल बंद करून टाकली होती. मात्र, अहमदाबाद क्राईम ब्रँचला सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या गुप्त सूत्रांकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, शांतीगिरी यांचा मृत्यू आकस्मिक नव्हता किंवा त्यांनी आत्महत्याही केली नव्हती, तर एका सुनियोजित आणि थंड डोक्याने रचलेल्या कारस्थानांतर्गत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा धागा पकडून क्राईम ब्रँचच्या 2 पीएसआय (PSI) आणि 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सलग दोन महिने अहोरात्र काम करत या प्रकरणातील एकामागून एक कड्या जोडल्या. अखेर पोलिसांनी शांतीगिरी यांची 50 वर्षीय पत्नी जागृती गोस्वामी आणि तिचा 54 वर्षीय प्रियकर कांतीलाल ऊर्फ भरत साबरिया या दोघांना अटक करून या भयानक हत्याकांडाचा उलगडा केलाय.
हेही वाचा : प्रेयसीचा मोबाईल चेक केला अन् संतापला, प्रियकराने सगळंच संपवलं, उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेत...
अहमदाबाद क्राईम ब्रँचचे एसीपी (ACP) भरत पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर या मर्डर मिस्ट्रीच्या संदर्भात जे धक्कादायक खुलासे केले, ते ऐकून सर्वांचीच झोप उडाली. आरोपी महिला जागृती हिचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी याच्याशी झाले होते, ज्याच्यापासून तिला दोन मुले आहेत. परंतु, लग्नाच्या काही काळानंतरच जागृतीचे मन तिच्याच दीरावर म्हणजेच पतीच्या मोठ्या भावावर, शांतीगिरी यांच्यावर जडले. या दोघांमधील अनैतिक संबंध या थराला गेले की, जागृती आपल्या दोन्ही लहान मुलांना आणि पहिल्या पतीला वाऱ्यावर सोडून जेठ शांतीगिरी याच्यासोबत पळून गेली. या दोघांनी नंतर लग्न केले आणि ते दुसऱ्या एका गावात भाड्याने घर घेऊन पती-पत्नी म्हणून राहू लागले. मात्र, जागृतीच्या अनैतिक संबंधांचे जाळे इथेच थांबले नाही, कारण तिचा हा दुसरा पती शांतीगिरी हा पेशाने ट्रक ड्रायव्हर होता. तो जेव्हा जेव्हा माल घेऊन आपल्या ट्रकसह प्रवासावर निघायचा, तेव्हा सुमारे 20 ते 25 दिवसांनंतरच घरी परतत असे. पतीच्या याच दीर्घ अनुपस्थितीचा आणि घरातल्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन जागृती आपल्याच शेजारी राहणाऱ्या कांतीलाल ऊर्फ भरत साबरिया याच्या प्रेमात पडली. कांतीलाल तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने जाणीवपूर्वक शांतीगिरीशी मैत्री केली आणि त्यांच्या घराच्या अगदी जवळ एक खोली भाड्याने घेतली. शांतीगिरी घराबाहेर जाताच या दोघांचे उघडपणे भेटणे सुरु झाले आणि अनैतिक कृत्य सुरू व्हायचे.
हेही वाचा : पालघर: वऱ्हाडाच्या ट्रकवर कंटेनर आदळला, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू









