क्रोनोलॉजी समझिये… राजीव गांधीच्या हत्येतील दोषीला झालेली फाशीची शिक्षा, मग सुटका कशी?
चेन्नई: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी एजी पेरारिवलनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने एजी पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला पेरारिवलन याला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर या शिक्षेचं जन्मठेपेत बदल करण्यात आलं होतं आणि आता तुरुंगात चांगली वागणूक असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर […]
ADVERTISEMENT

चेन्नई: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी एजी पेरारिवलनला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने एजी पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीला पेरारिवलन याला फाशीची शिक्षा झाली होती. त्यानंतर या शिक्षेचं जन्मठेपेत बदल करण्यात आलं होतं आणि आता तुरुंगात चांगली वागणूक असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केली आहे.
न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. पेरारिवलन हा तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होता.
कलम 142 सर्वोच्च न्यायालयाला तिच्यासमोर प्रलंबित असलेल्या किंवा कोणत्याही प्रकरणामध्ये न्यायासाठी आवश्यक आदेश देण्याचा अधिकार देतं.
यापूर्वी 9 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने एजी पेरारीवलन याला जामीन मंजूर केला होता. त्याच्या तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळे सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. पेरारिवलन जेव्हा-जेव्हा पॅरोलवर बाहेर आला तेव्हा देखील त्याने कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार आली नसल्याचेही कोर्टात सांगण्यात आले होते.