CM शिंदे अन् MIDC ने पत्र लिहिली, मग वेदांताचा प्रकल्प गुजरातला कोणामुळे गेला?
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनवरुन सुरु झालेला राज्यातील राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद 5 दिवसानंतरही कायम आहे. 3 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने काहीच प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप होत आहे. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही ठपका ठेवण्यात येत आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही नुकतेच सत्तेबाहेर गेलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यूत्तर देण्यात येत […]
ADVERTISEMENT

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनवरुन सुरु झालेला राज्यातील राज्यातील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद 5 दिवसानंतरही कायम आहे. 3 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने काहीच प्रयत्न न केल्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा आरोप होत आहे. यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही ठपका ठेवण्यात येत आहे. त्याला सत्ताधाऱ्यांकडूनही नुकतेच सत्तेबाहेर गेलेल्या महाविकास आघाडीला प्रत्यूत्तर देण्यात येत आहे.
मात्र याच सर्व गदारोळात आता एकनाथ शिंदे यांनी 26 जुलै 2022 रोजी वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना लिहिलेले पत्र समोर आले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीनेही 5 सप्टेंबर 2022 रोजी अग्रवाल यांना लिहिलेले पत्र ‘मुंबई तक’च्या हाती लागले आहे.
नेमके काय आहे या पत्रांमध्ये?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 जुलै 2022 रोजी जे पत्र अनिल अग्रवाल यांना लिहिले होते, त्यात अग्रवाल यांनी राज्यात तळेगावमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याआधी महाराष्ट्र सरकारकडे 2 प्रमुख मागण्या केल्याचा उल्लेख आहे. यामध्ये या प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि केंद्र सरकारशी समन्वय या दोन गोष्टींचा उल्लेख आहे.
या पत्रानुसार एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही मागण्यांवर अग्रवाल यांना उत्तर देताना म्हटले की, समूहाच्या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक दिशेने विचार करत आहे. याविषयी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून त्या समितीने समुहाला देण्यात येणाऱ्या पॅकेजला प्राथमिक मान्यता दिली आहे. त्यानंतर याआधारे राज्य मंत्रिमंडळाचीही तातडीने मंजुरी घेण्यात येईल. ,असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते.