विनायक राऊतांविरोधात शिवसैनिकांची थेट आदित्य ठाकरेंकडे तक्रार

मुंबई तक

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी: रिफायनरीवरून शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेना खासादार विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. याबाबत राजापूरमधील नाटे विभागाचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी शिवसेनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना दिलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

रत्नागिरी: रिफायनरीवरून शिवसैनिक आक्रमक झाले असून, शिवसेना खासादार विनायक राऊत यांची शिवसैनिकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधातल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. याबाबत राजापूरमधील नाटे विभागाचे उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी शिवसेनिकांच्या सह्यांचे पत्र आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.

९० टक्के ग्रामस्थांचा विरोध अशी चुकीची वक्तव्य खासदार विनायक राऊत यांच्याकडून केली जात आहेत, स्थानिक जनता म्हणजे केवळ दोन-चार गावातील विरोधक नाही. विरोध करणाऱ्या दोन ते चार गावात विरोधाचा सुर, त्यांना वगळून प्रकल्पाला मुहुर्त स्वरुप देण्यासाठी शिवसेनेनी सहकार्य करण्याची मागणी पत्राद्वारे पत्राद्वारे करण्यात आली आहे. पत्रावर उपविभागप्रमुखापासून, शाखाप्रमुख ते शिवसेनेच्या ग्रामपंतायत सदस्यांच्या सह्या आहेत.

विनायक राऊतांविरोधात लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

आपण जाणताच आहात की रत्नागिरी जिल्हयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार कमालीच्या वेगाने घटली आहे व ती निरंतर कमी होत आहे. याचे प्रमुख कारण आहे युवक वर्गाचे नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ येथून मुंबई पुण्याच्या दिशेने होणारे स्थलांतर… कोकणातील प्रमुख फळपीक आंबा, हे मोसमी फळपीक असून केवळ हंगामी रोजगार उपलब्ध करून देणारे आहे. विविध नैसर्गिक कारणामुळे येथील मत्स्योत्पादनात ही कमालीची घट दिसून येत आहे. पर्यटन व्यवसाय सुद्धा येथे फार बेताबेतानेच चालला आहे. औद्योगिक विश्वात म्हणण्यासारखे फारसे आशादायक चित्र नाही. परिणामस्वरूप रत्नागिरी जिल्ह्यातील युवक हा कायमच नोकरीधंद्याच्या शोधार्थ मुंबई – पुणे कोल्हापूरच्या दिशेने निघून जात राहणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp