काँग्रेससाठी हा ऐतिहासिक क्षण! भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर सोनिया गांधी यांचं भावनिक पत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसची भारत जोडो यात्रा आजपासून सुरू झाली आहे. राहुला गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. १२ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही यात्रा असणार आहे. ३ हजार ५७० किमीचं अंतर या यात्रेत कापलं जाणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वाची मानली जाते आहे.

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी या यात्रेविषयी एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या सगळ्यांनाच त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आपण या यात्रेत सहभागी होऊ शकलो नाही म्हणून खेदही व्यक्त केला आहे.

काय म्हटलं आहे सोनिया गांधी यांनी?

कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काँग्रेसने सुरू केली आहे. या दरम्यान मी उपचारांसाठी आणि वैद्यकीय तपासण्यांसाठी देशाबाहेर आहे. मी या यात्रेत सहभागी होऊ शकले नाही याबाबत दिलगीर आहे. आपल्या पक्षाची एक महान परंपरा आहे. काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस आणि भारत जोडो यात्रा सुरू होणं हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला विश्वास आहे की या यात्रेमुळे आपल्या संघटनेत अमूलाग्र बदल होईल. भारताच्या राजकारणातही परिवर्तन घडून येईल हा विश्वासही मला वाटतो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी खासकरून आपल्या पक्षातल्या १२० सहकाऱ्यांना शुभेच्छा देते. कारण हे सगळेच जण सुमारे ३६०० किमीची ही यात्रा पूर्ण करणार आहे. ही यात्रा अनेक राज्यांमधून जाणार आहे. ज्यामध्ये हजारो लोक सहभागी होतील. या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देते. वैचारिकदृष्ट्या मी तुमच्या सोबतच आहे. ही यात्रा कशी पुढे जाते आहे हे मी लाईव्ह पाहणार आहे. या आपण आता संकल्प करूया आणि आपल्या कर्तव्यांसाठी एकत्र येऊया.

जय हिंद

ADVERTISEMENT

सोनिया गांधी

ADVERTISEMENT

या आशयाचं पत्र लिहून सोनिया गांधी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच सर्वांनी एकत्र येऊया आणि परिवर्तन घडवूया अशी हाकही दिली आहे.

राहुल गांधींच्या यात्रेत कोणीही हॉटेलमध्ये राहणार नाही

भारत जोडो यात्रेअंतर्गत मोकळ्या मैदानात एक गाव बांधण्यात येईल. जेव्हा यात्रा पुढच्या जागेवर जाईल, तेव्हा तेच गाव एखाद्या मोकळ्या मैदानात उभे केले जाईल. कोणीही पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा हॉटेलमध्ये कुठेही राहणार नाही. लांबचा प्रवास असल्याने खूप उष्णता किंवा आर्द्रता असेल, म्हणून फक्त एसी वापरला आहे. डास आणि किड्यांपासूनही संरक्षण करायचे आहे.

काँग्रेसमध्ये नवा उत्साह भरण्याची तयारी

म्हणायला ही राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आहे, पण वास्तव हे आहे की काँग्रेस आजवरच्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. राहुल गांधी त्यांच्यात नवीन जोम आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आज भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात करत आहेत. राहुल गांधींचा हा प्रवास जवळपास 150 दिवस चालणार आहे. यादरम्यान 3,570 किमीचा प्रवास केला जाणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT