जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास करणार : नुतन पालकमंत्री केसरकर यांची ग्वाही

मुंबई तक

मुंबई : राजस्थानमधील जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या पर्यटनाबाबत विकास करणार अशी ग्वाही कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शनिवारी रात्री पालकमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरची जबाबदारी मिळाली ही आई अंबाबाईची कृपा आहे, असेही ते म्हणाले. केसरकर पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती शाहु महाराज, युवराज संभाजीराजे या सर्वांनाच वाटते की पर्यटनासोबत आपला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : राजस्थानमधील जयपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या पर्यटनाबाबत विकास करणार अशी ग्वाही कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शनिवारी रात्री पालकमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरची जबाबदारी मिळाली ही आई अंबाबाईची कृपा आहे, असेही ते म्हणाले.

केसरकर पुढे बोलताना म्हणाले, छत्रपती शाहु महाराज, युवराज संभाजीराजे या सर्वांनाच वाटते की पर्यटनासोबत आपला इतिहासही लोकांपर्यंत गेला पाहिजे. जयपूरप्रमाणेच भव्य वास्तू आणि जाज्वल्य इतिहास कोल्हापूर आणि साताऱ्याला आहे. सिंधुदुर्गप्रमाणेच कोल्हापूरमध्येही प्रगतशील शेतकरी आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार.

पालकमंत्र्यांची घोषणा :

शनिवारी रात्री राज्यातील सर्व जिल्ह्यांना हक्काचे पालकमंत्री मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. यात भाजपकडे 21 तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिंदे गटानेही औरंगाबाद, नाशिक, जळगाव असे स्वतःचे गड राखण्यात यश मिळविले आहे.

केसरकरांना कोल्हापूर आणि मुंबईची जबाबदारी :

या पालकमंत्रीपदाच्या यादीवर नजर टाकल्यास सिंधुदुर्गबाबत आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो. सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर आणि मुंबईचे पालकमंत्री म्हणून संधी देत शिंदे-फडणवीसांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp