शिंदे सरकारच्या खातेवाटपावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; पुढचंही सगळंच सांगितलं
– योगेश पांडे, नागपूर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. खातेवाटपावर काय म्हणाले […]
ADVERTISEMENT

– योगेश पांडे, नागपूर
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप मात्र रखडले होते. मात्र आता खातेवाटप झालेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलं आहे. येत्या १७ तारखेपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे, त्यामुळे मंत्र्यांचे खातेवाटप होणं गरजेचं होतं. खाते वाटपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
खातेवाटपावर काय म्हणाले फडणवीस?
खाते वाटप करणे हे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी खातेवाटप केलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री जे खाते आम्हाला मिळाले आहे, त्या खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे अर्धच मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे सर्वांवर जास्त भार आहे. पुढील विस्तारात आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं देखील ते म्हणाले.