संभाजीराजेंमुळे राज्यसभेची निवडणूक प्रचंड चर्चेत, समजून घ्या या निवडणुका होतात तरी कशा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. या सहाही जागा महाराष्ट्र विधानसभेतून असणार आहे. त्यातच संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती हे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळ राज्यसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. तर आपण जाणून घेऊयात राज्यसभेची निवडणूक नेमकी होती तरी कशी.

भारतात बायकॅमरल पार्लमेंटरी सिस्टिम आहे. म्हणजेच 2 सभागृह एक लोकसभा आणि एक राज्यसभा. राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे. जशी लोकसभा विसर्जित होते, तशी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी इथले काही सदस्य निवृत्त होतात आणि नवे सदस्य निवडून येतात. पण जसे लोकसभेचे सदस्य लोकांमधून निवडून येतात, तसे राज्यसभेचे सदस्य लोकांमधून नाही, पण तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदारच राज्यसभेचे सदस्य निवडतात.

कशी होते राज्यसभेची निवडणूक, राज्यातल्या आमदारांच्या संख्येवर राज्यसभेची गणितं कशी ठरतात हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संविधानातील आर्टिकल 83(1) नुसार राज्यसभा स्थायी सभागृह आहे. त्याचं विघटन हे करता येऊ शकत नाही. राज्यसभेचे एकूण सदस्य 245 असतात. ज्यामध्ये 12 खासदार हे राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. त्यांच्या व्यतिरिक्त उरलेले 233 खासदार निवडणुकीने राज्यसभेवर निवडून जातात.

कोणत्या राज्यातून किती खासदार राज्यसभेवर जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असतं. अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा-नगर हवेली, दमण, दीव आणि लक्षद्वीपमधून राज्यसभेवर एकही खासदार जात नाही.

ADVERTISEMENT

राज्यसभेच्या खासदाराचा कार्यकाळ 6 वर्षे असतो आणि दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

उमेदवार भारताचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.

राज्यसभा खासदाराच्या निवडणुकीचं गणित समजून घेण्यासाठी आपण उदाहरण महाराष्ट्राचंच घेऊ.

राज्यसभेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे आमदार मतदान करू शकत नाही. कारण विधान परिषद प्रत्येक राज्यात नसते. त्यामुळे फक्त विधानसभेचे आमदार राज्यसभा निवडणुकीत मतदान करू शकतात.

महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण आमदार 288 आहेत. आता उदाहरणाखातर आपण समजू राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक लागतेय, तर यामध्ये 1 अॅड करायचा म्हणजे झाले 8. आता एकूण आमदार 288 भागिले 8 करायचे, म्हणजे झाले 36. या 36 मध्ये पुन्हा 1 अॅड करायचा, म्हणजे झाले 37. ज्या उमेदवाराला राज्यसभेवर निवडून जायचं आहे त्याला किमान 37 मतांची गरज आहे.

जेव्हा मतदान होतं तेव्हा या आमदारांना त्यांचं प्राधान्य देता येतं. म्हणजे A B C असे 3 उमेदवार असतील तर पहिलं प्राधान्य C ला दुसरं प्राधान्य A ला आणि तिसरं प्राधान्य B ला असं देता येतं.

राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून यायला किमान 37 मतं तरी गरजेची असतात. आता या उमेदवारांमध्ये कुणालाच 37 मतं मिळाली नाहीत, तर सगळ्यात कमी मतं असलेली व्यक्ती बाद होते. उदाहरणाखातर C ला सगळ्यात कमी मतं मिळाली, तर ती बाद होणार आणि तिच्यासाठी मतदान केलेल्यांनी A आणि B ला जे प्राधान्य दिलं होतं ते पुढे पकडलं जातं. त्यानुसार A आणि B मध्ये ज्याला 37 मतं मिळतील ती व्यक्ती राज्यसभेची खासदार म्हणून निवडली जाते.

Sambhaji Chhatrapati: संभाजीराजेंची मोठी घोषणा, ‘या’ जागेवरुन अपक्ष लढणार!

खासदारकी कधी जाऊ शकते?

1. सदस्य मनोरुग्ण असेल

2. भारत किंवा राज्य सरकाराअंतर्गत कोणत्या पदावर असेल

3. स्वच्छेने त्या खासदाराने परदेशी नागरिकत्व घेतलं असेल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT