Uddhav Thackeray :”उद्या दाऊद भाजपमध्ये आला तर त्यालाही मंत्री करतील” मुख्यमंत्र्याचा टोला

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या बीकेसीमधल्या भाषणात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या टार्गेटवर भाजप असणार हे स्पष्ट होतं. त्यानुसारच त्यांचं हे भाषण होतं. कुणाच्याही अंगावर आम्ही जात नाही मात्र कुणी आला तर त्याला सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. एवढंच नाही तर उद्या दाऊद जरी भाजपमध्ये आला तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या बीकेसीमधल्या भाषणात भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या टार्गेटवर भाजप असणार हे स्पष्ट होतं. त्यानुसारच त्यांचं हे भाषण होतं. कुणाच्याही अंगावर आम्ही जात नाही मात्र कुणी आला तर त्याला सोडत नाही हे आमचं हिंदुत्व आहे असं आव्हान त्यांनी भाजपला दिलं आहे. एवढंच नाही तर उद्या दाऊद जरी भाजपमध्ये आला तर त्यालाही मंत्री करतील असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“महाराष्ट्राला बदनाम करणं सुरू आहे. आम्ही संयम बाळगतो आहोत म्हणजे बोलू शकत नाही असं नाही. सत्ता मिळत नाही म्हणून जे काही चाललं आहे ते दुर्दैवी आहे. भाजप कोणत्या दिशेने चाललं आहे तेच कळत नाही. महाराष्ट्र विद्रुप करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. हिंदुत्वाची चिंता करण्याची गरजच नाही तुम्हाला त्यासाठी आमचे मावळे इथे बसले आहेत.”

हे वाचलं का?

    follow whatsapp