INDIA PC: शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

india alliance press conference sharad pawar made a unpredictable move challenged pm modi and also put ajit pawar in trouble
india alliance press conference sharad pawar made a unpredictable move challenged pm modi and also put ajit pawar in trouble
social share
google news

Sharad Pawar India PC: मुंबई: INDIA आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. याच बैठकीच्या निमित्ताने आज (30 ऑगस्ट) एक पत्रकार परिषद पार पडली. ज्याला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण हे नेते हजर होते. यावेळी या सर्वच नेत्यांनी भाजपच्या हुकूमशाही विरोधात आपण एकत्र आल्याचा दावा केला. पण याच पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एक असा डाव टाकला की, ज्यामुळे अजित पवार खूपच अडचणीत येण्याची शक्यता आहे. (india alliance press conference sharad pawar made a unpredictable move challenged pm modi and also put ajit pawar in trouble)

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत गेले यावरून जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी एक मोठं विधान केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच चॅलेंजही दिलं.

‘सहकारी बँक, सिंचन घोटाळा झाला असेल तर, सखोल चौकशी करा…’

‘मी पंतप्रधान मोदींचं भोपाळचं भाषण ऐकलं.. भोपाळच्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन घोटाळा या दोन गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Crime: ‘मुलगा अशुभ होता, म्हणून…’, एका वर्षाच्या चिमुकल्याचा गळा घोटला

‘माझा आग्रह एकच आहे पंतप्रधानांजवळ की, ते पंतप्रधान आहेत देशाचे. जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजासमोर करावी. फक्त आरोप करण्यात अर्थ नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. त्याची चौकशी करा.. आणि संबंध देशाला सांगा वस्तुस्थिती काय आहे.’ असं म्हणत शरद पवार यांनी एकाच वेळी पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

जागा वाटपावर देखील शरद पवारांचं मोठं विधान

‘आम्ही जागा वाटपाची चर्चा सुरू केलेली नाही. आमच्या पहिल्या ज्या दोन बैठका झाल्या त्या महत्त्वाच्या होत्या. उद्या इथून पुढचा आपला सामूहिक कार्यक्रम काय असावा याच्यासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्या शक्यतेच्या मध्ये जर असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी टाकली जाईल. की, तुम्ही अन्य राजकीय पक्षाशी डायलॉग साधा. यातून आपण एकत्र जाऊ शकतो का? यासंबंधीचा अभ्यास करा.’

ADVERTISEMENT

‘वेगवेगळे पक्ष आहेत ही गोष्ट खरी आहे. पण बसून किमान समान कार्यक्रम ठरवून आम्ही तयार करू शकतो. याआधारेच आपणच पुढे जाऊ शकतो.’ असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंनीही मारला टोमणा…

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील पंतप्रधान पदावर भाजपला टोमणा मारला. ‘आमच्याकडे पंतप्रधान बनविण्यासाठी अनेक पर्याय आहेत. प्रश्न हा आहे की, भाजपकडे काय पर्याय आहे. जे 10 वर्ष बसले होते त्यांनी काय केलं हे आपण पाहिलं आहे. सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आता त्यांना निवडणूक जिंकायची आहे.. कारण कर्नाटकमध्ये पाहिलं की, कोणतंही यश भाजपला मिळालं नाही. बजरंगबली आणावे लागले तरी यश मिळालं नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं आहे.

हे ही वाचा >> Nitesh Rane: ‘मातोश्री’ची खरी मम्मी उद्या मुंबईत येणार…’, ठाकरेंवर टीका करताना राणेंनी सोडली पातळी!

वंचित बहुजन आघाडी आणि INDIA बाबत उद्धव ठाकरे म्हणाले की…

‘प्रकाश आंबेडकर आणि आमची युती आम्ही 23 जानेवारीला जाहीर केली आहे. आता या इंडिया आघाडीत येण्यासंबंधी आम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलावं लागेल. एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर एकमेकांपासून वेगळं होण्यासाठी एकत्र येत नाही. त्यामुळे व्यवस्थित चर्चा करून.. त्यांची जर तयारी असेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडियामध्ये सामील होऊ शकतात.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT