Pune-Nashik Railway वाद : 8 ट्विट अन् 7 प्रश्नांसह अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला इशारा
पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही उडी घेतली आहे. एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर आक्षेप येत असतील तर इतकी वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. तसंच हा प्रकल्प रद्द झाल्यास जनआंदोलन करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी […]
ADVERTISEMENT

पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही उडी घेतली आहे. एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर आक्षेप येत असतील तर इतकी वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल कोल्हे यांनी केला आहे. तसंच हा प्रकल्प रद्द झाल्यास जनआंदोलन करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे :
अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि ट्विटवरुन याबाबत काही सवाल करत भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आता प्रकल्पाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, ते डीपीआर सुरु करताना का घेतले गेले नाही? रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली, तेव्हा का हे आक्षेप नव्हते? नियोजन आयोगाने मंजुरी दिली तेव्हा का हे आक्षेप नव्हते? एवढी वर्षे प्रकल्प पुढे गेल्यानंतर अचानक जर हे आक्षेप येत असतील तर याबद्दल नक्कीच प्रश्न उपस्थित होतात. इतकी वर्षे झोपा काढल्या का?
? आता प्रकल्पाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, ते डीपीआर सुरु करताना का घेतले गेले नाही?
? रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली, तेव्हा का हे आक्षेप नव्हते?
? नियोजन आयोगाने मंजुरी दिली तेव्हा का हे आक्षेप नव्हते?— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 22, 2022
एमआरआयडीसीने डेव्हलप केलेल्या या प्रकल्पाची थेट अंमलबजावणी होतेय, याबद्दल रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांना तर पोटशूळ उठला नाही ना? हा कोणाच्याही व्यक्तिगत हिताचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असा गाजावाजा आपण करत असताना पहिल्यांदा ब्रॉडगेजवर होणारी ही हायस्पीड रेल्वे आहे. ही इंडियन टेक्नॉलॉजी आपण नाकारतोय आणि महागड्या परदेशी टेक्नॉलॉजीला पायघड्या घालतोय. मग आत्मनिर्भर भारत कुठे गेला?
? हा कोणाच्याही व्यक्तिगत हिताचा नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प आहे.
? एकीकडे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया असा गाजावाजा आपण करत असताना पहिल्यांदा ब्रॉडगेजवर होणारी ही हायस्पीड रेल्वे आहे. ही इंडियन टेक्नॉलॉजी आपण नाकारतोय आणि महागड्या परदेशी टेक्नॉलॉजीला— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) October 22, 2022
सर्व टप्पे या प्रकल्पाने पार केले. सर्व प्रकारच्या मंजुऱ्या, गुंतवणूकपूर्व हालचाली, रेल्वे बोर्डाच्या मंजुऱ्या, नियोजन विभागाची मंजुरी असे सगळे टप्पे पार केल्यानंतर अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित करून हा प्रकल्प गुंडाळला जात आहे. जगातील सर्व हायस्पीड रेल्वे जमिनीवरूनच सुरु झाल्या. मग पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेलाच जमिनीवरून नेण्यास विरोध का? राजकीय हेतू बाजूला ठेवून पुणे ते नाशिक या भागातील सर्वांगीण विकासासाठी वरदान ठरू शकणारा हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग अंमलात आलाच पाहिजे.